शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ बाल शिक्षण ]

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.
कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.
बदल घडवून आणणारे शेती, औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत. परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली. विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले. संगणन व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले. आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत. त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.
वेग, अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. यातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती. हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत. या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषत: विद्यर्थ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत.
अशा अनेक महाप्रवाहांचा, आव्हानांचा आणि संधींचा अनुभवजन्य परिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. तसे केल्यासच त्यांचे शिक्षण जीवनाभिमुख, भविष्यवेधी व म्हणूनच अर्थपूर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य केवळ सुरक्षितच नव्हे तर उज्ज्वलही होऊ शकेल. पण तसे न केल्यास आपण त्यांना भूतकाळासाठी तयार करू!
हे महाप्रवाह, आव्हाने व संधींच्या संदर्भातील “नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये काय असायला हवीत व अशा उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत केवळ सुधारणा (रिफॉर्म) करून चालणार नाही तर त्यात विचारपूर्वक परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) घडवून आणावे लागेल. प्रचलित व्यवस्था काहीशी बंदिस्त व साचेबंद आहे. त्यामुळे त्यातील ठराविक अभ्यासक्रम व त्याच्या ठराविक पद्धतीच्या अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनातून शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याला मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेतून नवे महाप्रवाह, नवी आव्हाने व नव्या संधी यांच्या संदर्भात होऊ शकणाऱ्या विद्यार्थी विकासालाही मर्यादा आहेत.
नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये कितीही अवघड असली तरीही तशा परिवर्तनासाठी शिक्षक या त्यातल्या त्यात अधिक प्रभावी घटकापासून सुरुवात करता येईल. जिद्दीने प्रयत्न करू शकणाऱ्या शिक्षकांना हुडकून काढून प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विषयनिहाय अपेक्षित असलेली पाठ्यपुस्तकांमधील किमान उद्दिष्ट्ये वरील आव्हाने व संधींचा परिचय होण्यासाठी आधारभूत आहेत. पण पुरेशी मात्र नाहीत. ती किमान उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी योग्य ते अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट गुणवत्तेने केलेच पाहिजे. व्यवस्थेची व समाजाची ती किमान अपेक्षा आहेच. पण नव्या परिवर्तनासाठी त्या पलिकडे जावे लागेल. केवळ ‘विषयांचे शिक्षक’ हे साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी हवेत ‘विद्यार्थ्यांचे शिक्षक’.
त्यामुळे किमान अपेक्षांची उत्तम परिपूर्ती करणाऱ्या पण तेथेच न थांबता त्यापुढे जाऊन आपल्या प्रतिभेने व अतिरिक्त प्रयत्नांनी विशिष्ट शैक्षणिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे उचित होईल. ती परिवर्तनाची उचित सुरुवात ठरेल. अशा शिक्षकांनी हे महाप्रवाह, त्यातील आव्हाने व संधी यांचा निरंतर अभ्यास करून अध्यापनात व शालेय उपक्रमात सतत अनुकूल बदल करायला हवेत.
अशा परिवर्तनशील शिक्षणाची अर्थात ‘नवशिक्षणा’ची सुरुवात सध्याच्या शालेय पर्यावरणाशी मेळ राखत, त्यातील सर्व सहभाग-धारकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळवून व विरोध टाळून करावी लागेल. योग्य अशा व नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमेतर कृतीशील उपक्रमांमधून, वेळापत्रकेतर वेळात व चाकोरीबाह्य पद्धतीने ती करणे उचित ठरेल. तसे होतकरू व उपक्रमशील शिक्षक या फेलोशिपसाठी पात्र ठरतील. अशा शिक्षकांकरवी परिवर्तनाची सुरुवात करता येईल.
उत्साही, हिकमती, नाउमेद न होता अडचणींचे संधीत रुपांतर करणाऱ्या, विशिष्ट ज्ञान क्षेत्रे, विद्या किंवा कलांमध्ये तरबेज असलेल्या, विद्यार्थ्यांचा विकास करण्यात मनापासून रस असलेल्या, ‘हटके’ प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या नानाविध उपक्रमांद्वारे हळूहळू हे ‘नवशिक्षण’ मुख्यप्रवाही करण्याचा मार्ग सापडू शकेल. अशा शिक्षकांना आपण ‘बलशाली मार्गशोधक’ किंवा ‘पाथफाइंडर’ किंवा ‘इंस्पायरर फेलोज्’ म्हणूया.
आपल्यला असे शिक्षक शोधून काढावे लागतील. विहित अभ्यासक्रमकेंद्री अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या पलिकडे जाऊन सातत्याने परिवर्तनशील कामगिरी केलेल्या शिक्षकांची निवड करावी लागेल. वेळापत्रकापलिकडे जाउन, अभ्यासक्रमापलिकडच्या कल्पक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण करू पाहणाऱ्या व त्यासाठी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना नवशिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वाव, पाठबळ, मदत, प्रोत्साहन, प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रतिष्ठा द्यावी लागेल.
त्यांना नवी आव्हाने व संधींशी सुसंगत अशा त्यांच्या पसंतीच्या व प्राविण्याच्या उपक्रमांच्या आरेखन व अंमलबजावणीसाठी रोख रक्कम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन या स्वरूपातील शिष्यवृत्ती / प्रकल्प-वृत्ती देण्यात येईल. त्या प्रकल्प-वृत्तीस “माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” असे संबोधण्यात येईल.
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. याच शिक्षण क्षेत्रांत नवीन प्रयोग, संशोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना संशोधनाची संधी मिळावी त्यांच्यातील नव्या कल्पनाना वाव मिळावा आणि प्रयोगांना चालना मिळावी, तसेच शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी उमेद मिळावी, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन देण्यात येते. ही फेलोशिप शिक्षकाना 20 प्राथमिक आणि 10 माध्यमिक शिक्षकाना दिली जाते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या संशोधनात्मक कामाला चालना देणे, हे मुख्य उद्दिष्ट या फेलोशिपचे आहे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक शिफारशी केल्या आहेत आणि कार्यक्रमही सुचवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम (SARTHAQ भाग १ आणि २), तसेच निपुण भारत अभियान. तसेच भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने मूल्यशिक्षण, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, विविध विषयांचा परस्परांशी आणि कला व खेळ यांच्याशी समन्वय, बहुवर्ग अध्यापन, वाचताना वाचनाचा वेग आणि आकलन वाढवण्यासाठी घेतलेले उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे अनेक उपक्रम आयोजित करता येतील. ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपुर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल.
सध्या महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ दिली जाते. नवोपक्रम किंवा संशोधन करण्यासाठी काही रोख रक्कम व मार्गदर्शन असे या फेलोशिपचे स्वरूप असते. या फेलोशिपबद्दलची अधिक माहिती आपण पुढील लिंक वर पाहू शकता. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ बाल शिक्षण ] या वर्षी प्रथमच शालापूर्व स्तरावर बालशिक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या फेलोशिप मधील 10 जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शालापूर्व स्तरावर कृती संशोधनाला प्रोत्साहन मिळावे असा हेतू या निर्णयामागे आहे.
या अंतर्गत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, CDPO, अनुदानित शाळांतील बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते हे फेलोशिपसाठी पात्र असतील. त्यांना बालशिक्षण क्षेत्रात कृती संशोधन करण्याची संधी दिली जाईल.
बालवयातील शिक्षणाचे महत्त्व
बाल्यावस्था—विशेषतः जन्म ते ६ वयोगट—हा मेंदूच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाचा कालखंड असतो. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मानवी मेंदूचा सुमारे ९०% विकास पूर्ण होतो. या वयात मिळणारे अनुभव, शैक्षणिक वातावरण, खेळ, अन्वेषण आणि कृतीच्या संधी मुलांच्या एकूण शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासावर खोल परिणाम करत असतात.
भारतातील बालशिक्षणाचा प्रवास
१९७५ मध्ये सुरू झालेल्या ICDS (Integrated Child Development Scheme) अंतर्गत अंगणवाड्यांद्वारे बालशिक्षणाच्या सेवा दिल्या जाऊ लागल्या. मात्र, ICDS मधील इतर आरोग्य व पोषण सेवांबरोबर शिक्षण ही एक सेवाच ठरली. त्यामुळे शिक्षणाला अपेक्षित प्राधान्य मिळाले नाही. महाराष्ट्रात ‘आकार’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अंगणवाड्यांतील शिक्षणासाठी एक चौकट निर्माण करण्यात आली. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांमध्ये बालशिक्षणाचे अधिक चांगले काम होऊ लागले आणि सेविकांना विशेष प्रशिक्षणही मिळाले. तरीही, बालशिक्षण औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या कक्षेबाहेरच राहिले.
शैक्षणिक धोरणानुसार बदल
२०२० साली जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP 2020) बालशिक्षणाला प्रथमच औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. वय वर्षे ३ ते ८ या काळाला शिक्षणातील Foundational Stage म्हणण्यात आले आहे, त्यासाठी विशेष अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाड्या, बालवाड्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्राथमिक शाळांशी जोडल्या आहेत.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील अंगणवाडी व इतर संस्थांमध्ये बालशिक्षणाच्या संदर्भात संशोधन व कृती अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. आपण SPIF in Education ही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाना गुणवत्तेनूसार देत आहोत. बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजवणाऱ्या अंगणवाडी सेविकाना SPIF in Education देण्यात येईल, यामुळे अंगणवाडी सेविकाना प्रेरणा मिळून त्यांचे सक्षमिकरण होईल, याचा विश्वास वाटतो. त्यामुळे या वर्षीपासून शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमध्ये बालशिक्षण क्षेत्रासाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बालशिक्षणामध्ये कृतीसंशोधनाची अनोखी संधी: NEP 2020 च्या अंमलबजावणीतील दरी शोधणे
बालशिक्षण (Early Childhood Education - ECE) क्षेत्रात कृतीसंशोधन (Action Research) करण्याची ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये प्रथमच बालशिक्षणाचे महत्त्व शासकीय स्तरावर सखोल आणि विस्तृतपणे अधोरेखित करण्यात आले आहे. या धोरणाने बालवयातील शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणले असून, या टप्प्यावर काम करणाऱ्या सर्वांसाठी हे एक मोठे आणि आशादायक पाऊल आहे.
NEP 2020 आणि बालशिक्षणाचे महत्त्व
NEP 2020 ने बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या शिक्षणाला पायाभूत स्तरावर (Foundational Stage) विशेष महत्त्व दिले आहे. यात लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला गेला आहे, ज्यात शारीरिक, भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक आणि भाषिक विकासाचा समावेश आहे. या धोरणाने केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमाची नव्हे, तर मुलांच्या खेळातून शिकण्याची प्रक्रिया, शिक्षकांचे प्रशिक्षण, पोषक वातावरण आणि पालकांचा सहभाग या सर्व पैलूंना महत्त्व दिले आहे.
कृतीसंशोधनाची आवश्यकता: धोरण आणि वास्तव यातील दरी
या महत्त्वाच्या धोरणाची अंमलबजावणी करत असताना आपल्याला एक मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे: ती म्हणजे धोरणात नमूद केलेल्या अपेक्षा (Policy Demands) आणि प्रत्यक्षात काय घडत आहे किंवा घडत नाही (Current Reality) यातील दरी (Gaps) शोधणे. हेच आपल्या कृतीसंशोधनाचे मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.
उदाहरणार्थ
१. धोरणातील तरतूद: NEP 2020 बालवाडी शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणावर भर देते.
• शोधण्याची दरी: प्रत्यक्षात किती शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण मिळत आहे? प्रशिक्षणाचा दर्जा कसा आहे आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष वर्गात त्या ज्ञानाचा उपयोग करत आहेत का?
२. धोरणातील तरतूद: खेळातून शिकणे (Play-based learning) आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतींचा वापर.
• शोधण्याची दरी: खरंच किती शाळा किंवा अंगणवाड्यांमध्ये या पद्धतींचा अवलंब केला जात आहे? यासाठी आवश्यक साधने आणि संसाधने उपलब्ध आहेत का? शिक्षक पारंपरिक पद्धती सोडून नवीन पद्धती स्वीकारण्यास तयार आहेत का?
३. धोरणातील तरतूद: पालकांचा सहभाग आणि समाज-आधारित दृष्टिकोन.
• शोधण्याची दरी: पालक बालशिक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत का? त्यांचे सहभागाचे प्रमाण किती आहे आणि कोणत्या स्तरावर आहे?
या दरी शोधण्यामुळे आपल्याला नेमके कुठे काम करण्याची गरज आहे, कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत आणि कोणत्या अडचणी दूर करायच्या आहेत, हे स्पष्ट होईल. हे केवळ धोरणातील त्रुटी शोधण्यापुरते मर्यादित नसून, धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणि बालकांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
A. एकविसाव्या शतकातील प्रमुख अनिष्टमहाप्रवाह आणि नवी आव्हाने
१. |
कोविड-१९ विषाणूजन्य व अन्य महासाथींचा चालू व संभाव्य प्रादुर्भाव, |
२. |
पर्यावरण, नैसर्गिक संसाधने व नैसर्गिक परिसंस्थांचा पराकोटीचा व अपरिवर्तनीय विनाश, चंगळवादाचा अतिरेक, कौटुंबिक व सामाजिक जीवनाचे बाजारीकरण, |
३. |
जीवजातींचा व जैवविविधतेचा वाढता विनाश व त्यातून मानवजातीच्या अस्तित्वाला धोका, |
४. |
पृथ्वीवर सर्वत्र वेगाने होत असलेले हवामानातील अनपेक्षित, तीव्र व हानिकारक बदल, कर्बवायूचे वाढते प्रमाण, हवेच्या सरासरी तापमानात वाढ,महासागरांच्या सरासरी तापमानातील वाढ,कमी काळात होणारी अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर, व त्यानंतरची प्रदीर्घ आवर्षणे व दुष्काळ, वाळवंटीकारण, गारपिटी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, जंगलातील अनिर्बंधवणवे, उष्णतेच्या लाटा, ध्रूवीय बर्फ वितळणे, हिमनद्यांचा ऱ्हास, भूस्खलन, टोळधाडी, पिकांवरील किडींचा वाढता प्रादुर्भाव, जमीन, नद्या व समुद्रातील मानवनिर्मित कचऱ्यात बेसुमार वाढ, जमीन, हवा व पाणी यांचे आधुनिक शेती, उद्योगधंदे व जीवनशैलीमुले होणारे जीवघेणे प्रदूषण तसेच उत्पादन व वहातुक, इ. मुळे अप्राप्य उष्णतेचे प्रचंड उत्सर्जन, इ. व या सर्वांमुळे मानवी जीवन व जीवसृष्टीवर होणारे गंभीर दुष्परिणाम, |
५. |
संपत्तीचे पराकोटीचे केंद्रीकरण, आर्थिक विषमतेची सुनामी,कल्याणकारी राज्याचाविलय, भ्रष्टाचार, |
६. |
गरीब, वंचित, पीडित, शोषित, कुपोषित, रोगग्रस्त, विस्थापित, बेघर,बेरोजगार, बेदखल व सामाजिकप्रतिष्ठा नाकारली गेलेल्या निराशाग्रस्त जनसंख्येत लक्षणीय वाढ, |
७. |
स्त्रियांच्या आरोग्य, जीवनमान व विकासाच्या संधींमध्ये घट, |
८. |
कुपोषित, कुंठीत व अपंग बालकांच्या संख्येतील लक्षणीय वाढ, |
९. |
सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लोकशाही, शांतता यांचा जगभर वाढता संकोच, |
१०. |
व्यक्तिवादाचा अतिरेक,कुटुंबस्वास्थ्याचा ऱ्हास, सामाजिकतेला ग्रहण, मानसिक रुग्णांची वाढती संख्या, |
११. |
झुंडशाही व हिंसाचारात लक्षणीय वाढ,सार्वजनिक जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनाला, बुद्धिवादाला व विवेकवादाला वाढता विरोध, |
१२. |
शस्त्रास्त्र स्पर्धा, अमली पदार्थांचा वाढता व्यापार,दहशतवाद, कट्टरतावाद, संकुचित राष्ट्रवाद यांचा अतिरेक, |
१३. |
विविधतेने नटलेल्या स्थानिक भाषा आणि संस्कृतींच्या अस्तित्वाला वाढता धोका, भाषिक व सांस्कृतिक सपाटीकरण,प्रगत देशांचा वाढता सांस्कृतिक वर्चस्ववाद, इ. |
B. एकविसाव्या शतकातील प्रमुख इष्ट महाप्रवाह आणि नव्या संधी
१. |
थोड्या असामान्य व्यक्तींच्या असामान्य कृतींपेक्षा बहुसंख्य सामान्य लोकांच्या असामान्य सामुहिक कृतींचा वाढता प्रभाव– |
२. |
आपत्ती निवारण, जीवनमान सुधारणा व पर्यावरण-संजीवक परिवर्तन, इ. क्षेत्रात ग्रीन कॉलर रोजगाराच्या वाढत्या स्थानिक व जागतिक संधी, |
३. |
‘रिमेकिंग दि वे वी मेक थिंग्ज’ अर्थात रिड्यूस, रियूज, रिफ्यूज, रिस्टोअर, रिसायकल, रिकव्हर, रिजनरेट या तत्वांवर आधारित व ‘सर्क्युलर इकनॉमी’वर आधारित नवी उत्पादन व्यवस्था, उद्योजकता, जीवनशैली, |
४. |
जैवविविधतेवर आधारित विषमुक्त अन्नपुरवठा करणारी नवी संजीवक शेती वउदरभरण, सुपोषण व आरोग्य रक्षणाचे नवोन्मेष, |
५. |
न्यू करिअर्स इन रिपेअरिंग दि डॅमेज्ड प्लॅनेट, बिघडलेली पृथ्वी ‘दुरुस्त’ करणारे रोजगार, २०३५ सालापर्यंत प्रगत जगातील २५% रोजगार होणार ग्रीन कॉलर, ग्रीन कॉलर उद्योजकतेला वाढता वाव, |
६. |
वाढते आयुर्मान,विकसित जगातील वृद्धांचे वाढते प्रमाण, त्यामुळे भारतीय तरुणांना जगभर स्थाईक होऊन तेथे रोजगार व विकासाच्या संधी, त्या मिळविण्यासाठी भारतीयांचे लक्षणीय संख्येने देशांतरण,२०३५ साली स्वदेशाबाहेर स्थाईक होणाऱ्या जगातील एकूण नागरिकांपैकी सर्वाधिक नागरिक मूळचे भारतीय असतील, |
७. |
जगातल्या मोठ्या लोकसंख्येला ऐहिक सुखाच्या आकांक्षांची परिपूर्ती करणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय जीवनमानाची आस आणि त्याचवेळीती जीवनशैली पर्यावरणाशी संतुलित आणि शाश्वत राखण्याची कधी नव्हती एवढी अपरिहार्यता वनव्या शोधांमुळे तसे प्रत्यक्षात आणण्याच्या शक्यता, भारतीय विद्यार्थ्यांना या नव्या लाईफस्टाईल क्षेत्रात रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी, |
८. |
डिजिटल क्रांतीतून कर्मशील ज्ञाननिर्मिती, ज्ञानव्यवस्थापन,ज्ञानवितरण व आर्थिक-सामाजिक विकासासाठी त्या ज्ञानाचे व्यापक उपयोजन या महाप्रवाहाचा विस्फोट, ज्ञानाधिष्ठित समाज व ज्ञानकेंद्री अर्थव्यवस्था, स्टार्टअप्स व इतर उद्योग व संशोधन संस्थांच्या पेटंट्सच्या रॉयल्टीतून जगभरातून भारतात नवसंपत्तीचा ओघ निर्माण होण्याच्या शक्यता, नवोन्मेषी ज्ञानकर्मीसाठी, ज्ञान-उद्योजकांसाठी विकेंद्रित रोजगारांच्या व उद्योजकतेच्या भारतात लक्षावधी संधी, |
९. |
शेती, उद्योग व सेवा क्षेत्रात जडपदार्थ, कच्चा माल, उर्जा, आर्थिक भांडवल यांच्या ऐवजी कर्मशील ज्ञानाला वाढती मागणी, कर्मशील ज्ञान व नवतंत्रज्ञाने यांच्या उपयोजनातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील वस्तू (संगणक, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, मोटारी, दुचाकी, घरगुती वापराची वॉशिंग मशीनसारखी साधने, लसी, औषधे, इ.), उत्पादने आणि सेवांच्या किंमतीमध्ये विशेषत: वैज्ञानिक व उपयोजित ज्ञानशाखांमधील कर्मशील ज्ञानाला व नवतंत्रज्ञानाला व त्यांच्या बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या (पेटंट्सच्या) मानधनाला (रॉयल्टीला) मध्यवर्ती स्थान, त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना ‘नवोन्मेषी ज्ञानकर्मी’ / ‘नॉलेज वर्कर’ होण्याच्या तसेच ज्ञानाधारित उद्योजकतेच्या लक्षावधी संधी, |
१०. |
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने विकास व मानवी जीवनाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्शच नव्हे तर त्यांना खोलवर प्रभावित करणारा विस्तार, कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांचा शत्रू, वैरी, विरोधक, प्रतिस्पर्धी नसून भागीदार असणार आहे व जे विद्यार्थी स्वत:ची मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची टिकाऊ भागीदारी साधू शकतील त्यांना अधिक यशस्वी करिअर्स करता येतील, |
११. |
बिग डेटा, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कम्प्युटर व्हिजन, ब्रेन मॅपिंग, रोबोटिक्स, कोबोटिक्स, नॅनोतंत्रज्ञान, बायोतंत्रज्ञान, हरित उर्जा, सिंथेटिक बायॉलजी, जिनोमिक्स, आयओटी, थ्रीडीप्रिंटींग, ड्रोन्स, इलेक्ट्रिक व चालकविरहित वाहने,ऑगमेन्टेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी, क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, इंडस्ट्री ४.०, इंडस्ट्री ५.०, इ. स्मार्ट नवतंत्रज्ञानांचा वेगवान विकास व त्यांचा अफलातून संगम साधून मिर्माण होणारी नवउत्पादने व अभिनवसेवा,नवे रोजगार,नवी गिग इकनॉमी, |
१२. |
नवे रोबोबहुल असेन्द्रीय जग व बहुविध इम्प्लांटधरी मानवी शरीराचा आविष्कार व मानवी अस्तित्वाचा कल्पनातीत असा नवा आशय (ह्युमनॉईड), |
१३. |
भारताची न भूतो अशा दारिद्र्यमुक्त व विषमतामुक्त समृद्धीकडे संभाव्य झेप. |
या महाप्रवाहांचा,आव्हानांचा आणि संधींचा अनुभव जन्यपरिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. तसे केल्यासच त्यांचे शिक्षण जीवनाभिमुख, भविष्यवेधीव म्हणूनच अर्थपूर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य केवळ सुरक्षितच नव्हे तर उज्ज्वलही होऊ शकेल. पण तसे न केल्यास आपण त्यांना भूतकाळासाठी तयार करू!
हे महाप्रवाह, आव्हाने व संधींच्या संदर्भातील “नवशिक्षणाची उद्दिष्ट्ये काय असायला हवीत हे आपण पाहू.
C. नवशिक्षणाची उद्दिष्ट्ये
१. |
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात ज्ञान, निर्मिती, सौंदर्यदृष्टी,प्रेम व करुणेचा परिपोष साधणे. |
२. |
‘आजीवन ज्ञानसाधना’ करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पिंड घडवणे.त्यांना ‘लर्न-अन्लर्न-रीलर्न’चा रियाझ घडवणे. |
३. |
कुतूहल, जिज्ञासा, चौकसबुद्धी, वैज्ञानिक दृस्थीकोन,कळीचे प्रश्न उपस्थित करता येण्याची क्षमता, स्वतंत्र विचार व स्वतंत्र अभिव्यक्ती क्षमता,कलात्मक आविष्कार क्षमता,खिलाडू वृतीने अपयश पचविण्याची हिम्मत,साहसी-धाडसीवृत्ती,जोखीम स्वीकारण्याची तयारी, इ. गुणांचा परिपोष व्हावा असे शैक्षणिक वातावरण विकसित करणे. |
४. |
मृदू कौशल्ये,संवाद-कौशल्य, सहकार्य क्षमता, स्काउट-गाईड सदृश पुढाकार घेण्यची वृत्ती, निरपेक्ष वतत्पर सेवाभाव, इ. विकसित करणारे शैक्षणिक वातावरण विकसित करणे. |
५. |
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून उद्योजकतेचा अनुभवजन्य विकास करणे. |
६. |
विद्यार्थ्यांना सर्जनशील निर्मिती करायला शिकविताना ती निर्मिती कर्मशील ज्ञानाधिष्ठित कशी होईल, समाजविकासकेंद्री कशी होईल, त्याचवेळी पर्यावरणस्नेही कशी होईल व नवतंत्रविज्ञानस्नेही कशी होईल हे पाहणे. |
७. |
विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेशी तंत्रस्नेही भागीदारी यशस्वी करायाला कसे शिकतील,मात्र तिचे गुलाम होणार नाहीत हे सुनिश्चित करणे. |
८. |
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात उत्क्रांती व संस्कृतीतून मिळालेल्या निखळ व अंगभूतमानवी क्षमतांचा परिपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थीशुष्क,यंत्रवत किंवा रोबोसदृश होणार नाहीत याची कसोशीने काळजी घेणे. (तसे न केल्यास ते हमखास बेकारच नव्हे तर बेदखलही होतील.) |
९. |
विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील, विवेकी व सुसंस्कृत माणूस होण्यासाठी स्फूर्ती देणे व प्रयत्नकरणे.(मुलांना अधिक सुसंस्कृत माणसे होण्यास शिकवूया, यंत्रांना अधिक स्मार्ट यंत्रे बनण्यास ‘शिकवू’या आणि मुलांना यंत्रे होण्यापासून वाचवूया!) |
१०. |
विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या जगातील आव्हाने व संधी यांना आत्मविश्वासाने सामोरे जाणारे सक्षम व्यक्तिमत्व विकसित करणे. |
११. |
निर्भयता, नम्रता, सत्य, अहिंसा, साधी रहाणी, श्र्मानंद, इंदिये आणि मन यांचे आत्मसंयमन, सर्व नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने कमीत कमी वापर करणारी व शक्यतो स्थानिक संसाधानांतून बहुतेक गरजा पूर्ण करणारी जीवनशैली, इ. चा परिपोष करणारे शैक्षणिक वातावरण विकसित करणे. |
१२. | भारतीय संविधानातील मूल्यांचा आदर व मनापासून अंगिकार करणारे आणि आपली कर्तव्ये व हक्क यांचे मनापसून पालन करणारे व विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीविषयी आस्था असणारे व जगातील विविध संस्कृतींच्या विषयी संवेदनशीलता बाळगणारे सुजाण नागरिकत्व मुलांमध्ये विकसित करणे.
|
D. नवशिक्षणाची सुरुवात परिवर्तनशील शिक्षकांपासून
या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत केवळ सुधारणा (रिफॉर्म) करून चालणार नाही तर त्यात विचारपूर्वक परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) घडवून आणावे लागेल.प्रचलित व्यवस्था काहीशी बंदिस्त व साचेबंद आहे. त्यामुळे त्यातील ठराविक अभ्यासक्रम व त्याच्या ठराविक पद्धतीच्या अध्यापन, अध्ययनव मूल्यमापनातून शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याला मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेतून वर उल्लेखिलेले नवे महाप्रवाह, नवी आव्हाने व नव्यासंधी यांच्या संदर्भात होऊ शकणाऱ्या विद्यार्थी विकासालाही मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेत कोणताही बदल घडवून आणण्यातील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, पालक, शासन व समाज या सहभाग-धारकांचा उत्साह, सहभाग, पुढाकार व सातत्य, इ.वरही अनेक मर्यादा असतात हे दीर्घकाळ दिसून आले आहे.
वरील उद्दिष्ट्ये कितीही अवघड असली तरीही तशा परिवर्तनासाठी शिक्षक या त्यातल्या त्यात अधिक प्रभावी घटकापासून सुरुवात करता येईल.जिद्दीने प्रयत्न करू शकणाऱ्या शिक्षकांना हुडकून काढून प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विषयनिहाय अपेक्षित असलेली पाठ्यपुस्तकांमधील किमान उद्दिष्ट्ये वरील आव्हाने व संधींचा परिचय होण्यासाठी आधारभूत आहेत.पण पुरेशी मात्र नाहीत.ती किमान उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी योग्य ते अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट गुणवत्तेने केलेच पाहिजे.व्यवस्थेची व समाजाची ती किमान अपेक्षा आहेच.पण नव्या परिवर्तनासाठी त्या पलिकडे जावे लागेल.केवळ ‘विषयांचे शिक्षक’ हे साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी हवेत ‘विद्यार्थ्यांचे शिक्षक’.
त्यामुळे किमान अपेक्षांची उत्तम परिपूर्ती करणाऱ्या पण तेथेच न थांबता त्यापुढे जाऊन आपल्या प्रतिभेने व अतिरिक्त प्रयत्नांनी विशिष्ट शैक्षणिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे उचित होईल.ती परिवर्तनाची उचित सुरुवात ठरेल. अशा शिक्षकांनी वरील महाप्रवाह,आव्हाने व संधी यांचा निरंतर अभ्यास करून अध्यापनात व शालेय उपक्रमात सतत अनुकूल बदल करायला हवेत.
E. नवशिक्षणाची सुरुवात परिवर्तनशील उपक्रमांमधून
अशा परिवर्तनशील शिक्षणाची अर्थात ‘नवशिक्षणा’ची सुरुवात सध्याच्याशालेय पर्यावरणाशी मेळ राखत, त्यातील सर्व सहभाग-धारकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळवून व विरोध टाळून करावी लागेल.योग्य अशा व नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमेतर कृतीशील उपक्रमांमधून, वेळापत्रकेतर वेळात व चाकोरीबाह्य पद्धतीने ती करणे उचित ठरेल.तसे होतकरू व उपक्रमशील शिक्षक या फेलोशिपसाठी पात्र ठरतील. अशा शिक्षकांकरवी परिवर्तनाची सुरुवात करता येईल.
उत्साही, हिकमती, नाउमेद न होता अडचणींचे संधीत रुपांतर करणाऱ्या, विशिष्टज्ञान क्षेत्रे, विद्या किंवा कलांमध्ये तरबेज असलेल्या, विद्यार्थ्यांचा विकास करण्यात मनापासून रस असलेल्या, ‘हटके’ प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या नानाविध उपक्रमांद्वारे हळूहळू हे ‘नवशिक्षण’ मुख्यप्रवाही करण्याचा मार्ग सापडू शकेल. अशा शिक्षकांना आपण ‘बलशाली मार्गशोधक’ किंवा ‘पाथफाइंडर’ किंवा ‘इंस्पायरर फेलोज्’ म्हणूया.
आपल्यला असे शिक्षक शोधून काढावे लागतील. विहित अभ्यासक्रम केंद्री अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या पलिकडे जाऊन सातत्याने परिवर्तनशील कामगिरी केलेल्या शिक्षकांची निवड करावी लागेल.वेळापत्रकापलिकडे जाउन, अभ्यासक्रमापलिकडच्या कल्पक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण करू पाहणाऱ्या व त्यासाठीचा कोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना नवशिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वाव,पाठबळ, मदत,प्रोत्साहन, प्रशिक्षण,मार्गदर्शनव प्रतिष्ठा द्यावी लागेल.
त्यांना नवी आव्हाने व संधींशी सुसंगत अशा त्यांच्या पसंतीच्या व प्राविण्याच्या उपक्रमांच्या आरेखन व अंमलबजावणीसाठी रोख रक्कम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन या स्वरूपातील शिष्यवृत्ती / प्रकल्प-वृत्ती देण्यात येईल. त्या प्रकल्प-वृत्तीस “माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” असे संबोधण्यात येईल.
फेलोशिपसाठी वयोमर्यादा: | वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अंगणवाडी, बालवाडी सेविका पर्यवेक्षिका, CDPO, अनुदानित शाळांतील बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते |
फेलोशिप कालावधी: | जुलै २०२५ ते मे २०२६ |
फेलोशिपसाठी पात्रता: |
१. वर्ष २०२५-२६ साठी पाच फेलोशिप सबजेक्ट पेडागाँगी साठी आणि पाच फेलोशिप फाउंडेशनल स्टेज मधील कामासाठी दिल्या जाव्यात. २. फाउंडेशनल स्टेज मधील फेलोशिप पुढील प्रकारच्या व्यक्तीसांठी उपलब्ध असाव्यात
|
फेलोशिप्सची संख्या: | प्रती वर्षी १० |
अर्जदारांचे कार्यक्षेत्र | महाराष्ट्रातील अंगणवाडी, बालवाडी आणि बालशिक्षणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था |
फेलोशिपची रक्कम: | निवड झालेल्या प्रत्येक अंगणवाडी, बालवाडी सेविकेस वार्षिक रु. ६०,००० /- (रुपये साठ हजार फक्त). यापैकी रुपये ३०,०००/- फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास, इ. साठी लागणारा खर्च सदर रक्कमेतून करावयाचा आहे. रुपये ३०,०००/- हे कार्यशाळा आणि मेंटरिंग साठी खर्च केले जातील. |
१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे ‘नवोपक्रम’ करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.
२) आपण जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.
३) आपण करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.
४ ) आपण घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.
५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी घ्यावी.
६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.
७ ) आपला उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.
८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
a) Teachers who involved in Scout Guide (स्कॉऊट गाइड)
b) Climate Change (हवामान बदल)
c) Special Education (विशेष शिक्षण)
d) Children’s Health (Mental and Physical) (मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य)
e) Sports (खेळ)
f) Nature’s friend (निसर्ग मित्र, पर्यावरण रक्षक)
g) Performing Arts (कला)
h) Crafts and Culture (संस्कृती आणि हस्तकला)
i) Gender Equity (लिंग समभाव)
j) Promoting Scientific Temper (वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणे)
k) Inculcating Values of Indian Constitution (संविधानिक मूल्ये रुजवणे)
l) Reading Comprehensive (वाचन संस्कृति)
अर्ज प्रक्रिया
१. |
इच्छुक शिक्षकांनी दिनांक ३० जुलै २०२५ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. |
२. |
अर्जदारांनी फेलोशिपसाठी स्वत: हाती घेणार असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमा” विषयी मराठी किंवा इंग्रजी भाषेत पुढील मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांचे टिपण अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. |
२.१ |
उपक्रमाचे शीर्षक |
२.२ |
उपक्रमाची गरज, उपक्रम आपण का निवडला |
२.३ |
उपक्रमाचे महत्व |
२.४ |
उपक्रमाचे नाविन्य व वेगळेपण - शासकीय योजनेपेक्षा वेगळे परंतु शासकीय योजनांना पूरक |
२.५ |
आपण यापूर्वी काही नवोपक्रम केले आहेत काय ? |
2.6 |
यापूर्वी शासनास किवां इतर संस्थेस आपण काही नवोपक्रम सदर केले आहेत काय ? |
2.7 |
आपल्या नवोपक्रमाची दाखल घेतली गेली आहे काय ? असल्यास कोणत्या स्तरापर्यंत |
2.8 | उपक्रमासाठी लागणारी साधने व सोयी |
2.9 | आपला उपक्रम साधारण किती दिवस चालेल ? |
3.0 | आपल्या उपक्रमाचे स्थूल वेळापत्रक |
3.1 | उपक्रमाची फलनिष्पत्ती पाहण्यासाठीची व्यवस्था |
3.2 | उपक्रमासाठीचे अंदाजपत्रक |
3.3 | उपक्रमासाठीचे वेळापत्रक |
3.4 | उपक्रमासाठी लागणारी साधने व सोयी |
4 | आपण प्रस्तावित करत असलेला उपक्रम पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील (छायाचित्र, चित्रफित, परखड मूल्यमापन इ. अर्जासोबत जोडावे. |
5 | विषयनिहाय अभ्यासक्रमातील नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट असलेले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनविषयक उपक्रम या फेलोशिपमध्ये अपेक्षित नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी. प्रतिज्ञा पत्र : मी हा उपक्रम यापूर्वी कोणत्याही खाजगी/शासकीय किवां निमशासकीय संस्थेस सादर केलेला नाही. |
फेलोशिपच्या अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक
३० जुलै २०२५
अर्ज करण्याची अंतिम मुदत
३० जुलै २०२५
०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
अर्जाची छाननी आणि निवड प्रक्रिया
१६ ऑगस्ट
निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे
१६ ऑगस्ट
१४ डिसेंबर २०२५
फेलोशिप प्रदान सोहळा आणि नवीन फेलो व जूने फेलो यांचा एकत्रित परिचय आणि संवाद
४ आणि ५ ऑक्टोबर २०२५
द्वितीय कार्यशाळा
४ आणि ५ ऑक्टोबर २०२५
३० आणि ३१ ऑगस्ट २०२५
प्रथम कार्यशाळा
१,२,३ नोव्हेंबर २०२५
तृतीय कार्यशाळा
१,२,३ नोव्हेंबर २०२५
४,५,६ मे २०२५
चवथी कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण
फेलोशिपचा कालखंड – मे २०२५ ते मे २०२६
५, ६, ७ मे २०२५
प्रथम कार्यशाळा
५, ६, ७ मे २०२५
१५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५
प्रकल्पाना भेटी
१, २, ३ नोव्हेंबर २०२५
द्वितीय कार्यशाळा
१, २, ३ नोव्हेंबर २०२५
४, ५, ६ मे २०२६
तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण
अर्ज प्रक्रिया
इच्छुकांनी www.sharadpawarfellowship.com
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्जदारांनी फेलोशिपसाठी आपण स्वत: हाती घेणार असलेल्या उपक्रमाविषयी मराठी किंवा इंग्रजी भाषेतील सुमारे १००० शब्दांचे टिपण अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. या टिपणात आपण प्रस्तावित करीत असलेला शैक्षणिक परिवर्तन उपक्रमावरील कोणत्या परिवर्तन उद्दिष्टांशी सुसंगत असणार आहे, स्वत:च्या शाळेतील कुठल्या इयत्तांच्या किती विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणार आहे व शैक्षणिक वर्षभर तो कसा विकसित होत जाणार आहे याविषयीची स्पष्ट रूपरेषा अपेक्षित आहे. आपण हा उपक्रम पूर्वीपासून राबवत असल्यास त्याच्या मूल्यमापनाचा तपशीलही छायाचित्रे, इ. सह सोबत जोडावा.
निवड प्रक्रिया
तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल व पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच शिक्षकांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष / दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल. मुलाखत शक्यतो इच्छुक शिक्षकांनी अर्जासोबत पाठविलेल्या टिपणावर आधारित असेल. मुलाखतीतील गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी वरील प्रमाणे १० जणांची निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या फेलोची, फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचीही सहसंमती घेण्यात येईल.
योगेश कुदळे
शिक्षण विभाग प्रमुख
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
ई-मेल आयडी : education@chavancentre.org
फोन नं : +91 93707 99791
संजना पवार
सहाय्यक, शिक्षण विभाग
संपर्क – 8291416216